Mazi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात.
केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर पैसे मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातात.
गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे, या उद्देशातून राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांच अपघात विमा दिला जातो. त्याचसोबत ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.
या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात.